शब्दांना स्वर लाभल्यावर त्याची ’नादमयता’ वाचक श्रोत्यांसाठी ’चित्तवेधक’ बनते. स्वरांच्या लयीतून होणारा भावनोत्कर्ष हा रसिकाला भावभावनांच्या हिंदोळ्यावर झुलवत ठेवतो. त्यामुळे स्वरबद्ध व तालबद्ध झालेली लयप्राप्त भावगीते ही मनाला मोहवून टाकणारीही ठरतात. अशा भावगीतांमधील भावभावना जाणण्यातून मन प्रफुल्लित होण्याबरोबरच शुद्धतेचा अनुभव आणि आनंद मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे शब्द स्वरांच्या निमित्ताने लेखन मांडणी करणाऱ्या लेखिका डॉ. भारती सोनवणे आणि प्रकाशक श्री. प्रदीप पाटील तसेच भावगीताच्या भावविश्वाचा वाचनातून आनंद घेणाऱ्या वाचकांना या पुस्तकाच्या माध्यमातून अनेकानेक शुभेच्छा..!
- प्रा.डॉ. म. सु. पगारे
मानवतावादी विचारवंत व साहित्यिक
संचालक,
भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्र
संचालक,
विचारधारा प्रशाळा,
वरिष्ठ प्राध्यापक व विभागप्रमुख, (मराठी, हिंदी, इंग्रजी)
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव.