‘मानवता’ हे सर्वश्रेष्ठ मूल्य आहे. या पृथ्वीतलावरील मानवाचे ‘मानूस’ म्हणून असणारे अस्तित्व या मूल्याद्वारा परिभाषित होते. सामाजिक व आर्थिक विषमता, राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्याची लालसा यांमुळे क्रौर्य, द्वेष, असूया, हिंसा यांचे वाढते प्राबल्य मानवता मूल्यांच्या गळचेपी करीत आहे. चंगळ आणि उपभोग यांच्या आहारी गेल्यामुळे स्वतःच्या अधिकारांबद्दल जागरूक असणारा आजचा मानव आपल्या कर्तव्य व जबाबदाऱ्या यांबाबत मात्र सोयीस्कर भूमिका घेत आहे. माणूसपणाची होत असलेली ही अवहेलना लक्षात घेऊनच कवयित्री बहिणाबाई चौधरी प्रश्न विचारतात, ‘माणसा माणसा कधी व्हशीन माणूस’ म्हणूनच स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या चतु:सूत्रीतून आकारास येणारी मानवतावादाची संकल्पना मराठी साहित्यातून कशाप्रकारे अभिव्यक्त झाली आहे याचा शोध घेण्याच्या भूमिकेतून सदर पुस्तक निर्माण झाले आहे. हा मौलिक दस्तऐवज अभ्यासकांना निश्चितच उपयुक्त ठरेल.
- प्रा. विजय एल. माहेश्वरी
कुलगुरु