“आधुनिक महाराष्ट्राचा दृष्टिक्षेप” हे पुस्तक महाराष्ट्राच्या आधुनिक इतिहासाचा एक संक्षिप्त परंतु सखोल आढावा देण्याचा प्रयत्न आहे. यामध्ये ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेपासून ते सामाजिक सुधारणा, औद्योगिक व शेतीतील बदल, तसेच राष्ट्रवादाच्या उदयापर्यंतची घटना-प्रवाह स्पष्ट करण्यात आले आहेत.
या ग्रंथात मानवधर्म सभा, परमहंस मंडळी, प्रार्थना समाज, आर्य समाज आणि सत्यशोधक समाज यांसारख्या चळवळींचे योगदान विशद केले आहे, ज्यांनी अंधश्रद्धा, जातिभेद आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध संघर्ष केला. तसेच रामोशी, कोळी, भिल्ल उठाव आणि दक्खन दंगे यांसारख्या प्रतिकार चळवळींमधून राष्ट्रवादाचा अंकुर कसा फुटला, याचे ऐतिहासिक विश्लेषणही येथे आढळते. महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनाची जाणीव करून देणारा हा ग्रंथ इतिहासाच्या गाभ्याशी जोडणारा ठरेल.
1. ब्रिटिश सत्तेची स्थापना (Foundation of British Power)
1.1 वसाहतवादी राज्यव्यवस्थेची स्थापना
(Establishment of Colonial Rule)
1.2 अनुद्योगिकरण आणि शेतीचे व्यापारीकरण
(De-industrialization and Commercialization of Agriculture)
1.3 प्रशासकीय धोरणे - जमीन, दुष्काळ, शिक्षण आणि वृत्तपत्रे
(Administrative Policies -Land, Famine, Education Press)
2. सुधारणा चळवळी (Reform Movements)
2.1 मानवधर्म सभा आणि परमहंस मंडळी
(Manavdharm sabha and Paramhams Mandali)
2.2 प्रार्थना समाज आणि आर्य समाज
(Prarthana samaj and Arya samaj)
2.3 सत्यशोधक समाज
(Satyashodhak samaj)
3. राष्ट्रवादाचा उदय (Emergence of Nationalism)
3.1 प्रारंभिक प्रतिकार : रामोशी, कोळी, भिल्ल आणि दक्खन दंगे
(Early Resistance: Ramoshi, Koli, Bhill and Deccan riots)
3.2 राष्ट्रवादाची कारणे
(Causes of Nationalism)
3.3 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आणि मवाळवाद
(Foundation of Indian National congress and Moderate Nationalism)
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP - 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार,
द्वितीय वर्ष - इतिहास (OE) विषयाच्या नवीन अभ्यासक्रमानुसार
तसेच M.P.S.C., नेट-सेट व इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे अद्ययावत पुस्तक