‘19व्या शतकातील महाराष्ट्रातील समाजसुधारक’ हा ग्रंथ महाराष्ट्रातील सामाजिक पुनर्रचनेच्या प्रवासाचा जिवंत साक्षीदार आहे. नवजागरणाच्या प्रारंभी बालशास्त्री जांभेकर, जगन्नाथ शंकरशेठ आणि लोकहितवादी गोपाळ हरि देशमुख यांनी आधुनिक विचारधारेची भक्कम पायाभरणी केली. त्यांच्या लेखनातून आणि कृतीतून समाजमन जागृत झाले, नव्या विचारांचे बीज रोवले गेले.
महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण, स्त्रीमुक्ती आणि जातीय समतेसाठी अथक संघर्ष केला आणि सामाजिक समरसतेचा पाया रचला. ताराबाई शिंदेच्या लेखनातून स्त्रीवादी दृष्टिकोनाची ठाम अभिव्यक्ती झाली, तर बदरुद्दीन तैयबजी यांनी धर्मनिरपेक्षतेचा उदात्त आदर्श समाजासमोर ठेवला.
शतकाच्या उत्तरार्धात नारायण मेघाजी लोखंडे, न्यायमूत महादेव गोविंद रानडे आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या विचारांनी आधुनिकतेचा नवप्रभात उगवला. त्यांच्या कार्यातून सामाजिक सुधारणांचा नवा अध्याय सुरू झाला. शिक्षण, समता आणि आधुनिकतेच्या मूल्यांची जपणूक करणाऱ्या महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा गौरवशाली इतिहास या ग्रंथात सुसंगतपणे उलगडला आहे.